State News

उत्तर प्रदेशचं होणार विभाजन? ; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विभाजनाची जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्र सरकार (central government) उत्तर प्रदेशचं दोन ते तीन भागांमध्ये विभाजन करणार असल्याचा म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर, उत्तर प्रदेशचं विभाजन केल्यानंतर पूर्वांचल हे नवं राज्य स्थापन करण्यात येईल, असा दावादेखील करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशासह (Uttar Pradesh) अन्य राज्यांमध्येही या विभाजनाची जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु, व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये नेमकी किती सत्यता आहे हे पीआयबीने चेक केलं असून सत्य समोर आणलं आहे. (uttar-pradesh-to-be-divided-into-three-parts-by-central-government-know-truth-fact-check)

उत्तर प्रदेशमधील वाढती लोकसंख्या पाहता २००० मध्ये या राज्याचं विभाजन करण्यात आलं होतं. या विभाजनानंतर उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल (उत्तराखंड) हे नवीन राज्य तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा या राज्याचं विभाजन होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, व्हायरल होणारा हा मेसेज फेक असल्याचा दावा पीआयबीने केला आहे. याविषयी पीआयबीने ट्विट करुन सत्य उघड केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विभाजनाची जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्र सरकार (central government) उत्तर प्रदेशचं दोन ते तीन भागांमध्ये विभाजन करणार असल्याचा म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर, उत्तर प्रदेशचं विभाजन केल्यानंतर पूर्वांचल हे नवं राज्य स्थापन करण्यात येईल, असा दावादेखील करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशासह (Uttar Pradesh) अन्य राज्यांमध्येही या विभाजनाची जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु, व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये नेमकी किती सत्यता आहे हे पीआयबीने चेक केलं असून सत्य समोर आणलं आहे. (uttar-pradesh-to-be-divided-into-three-parts-by-central-government-know-truth-fact-check)

उत्तर प्रदेशमधील वाढती लोकसंख्या पाहता २००० मध्ये या राज्याचं विभाजन करण्यात आलं होतं. या विभाजनानंतर उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल (उत्तराखंड) हे नवीन राज्य तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा या राज्याचं विभाजन होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, व्हायरल होणारा हा मेसेज फेक असल्याचा दावा पीआयबीने केला आहे. याविषयी पीआयबीने ट्विट करुन सत्य उघड केलं आहे.

खरंच उत्तर प्रदेशचं विभाजन होणार ?

एका बातमीमध्ये उत्तर प्रदेशचं दोन ते तीन भागांमध्ये विभाजन होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यातून पूर्वांचल व अन्य राज्ये तयार केले जातील असा दावाही यात करण्यात आला आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. उत्तर प्रदेशचं विभाजन करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही, असं ट्विट पीआयबीने केलं आहे.

Comment here